- “•
“स्क्रीन टाईम ” मॅनेजमेंट करता येणं,मोबाईल डीटॉक्स करता येणं ही आजच्या काळाची गरज असून माहिती तंत्रज्ञान कायदा २०२१ नुसार (मार्गदर्शक तत्वे आणि माध्यम आचारसंहिता) यातील सूक्ष्म तत्वे समजून घेणं आवश्यक आहे ” असे प्रतिपादन प्रसिद्ध रंगकर्मी,इंडीयन स्कोलर, प्राइड ऑफ इंडिया चे मानकरी डॉ पंडित घनश्याम थोरात यांनी छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालय द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिराच्या विशेष व्याख्यान सत्राचं उद्घाटन करताना व्यक्त केले. यावेळी प्रा. डॉ. नरोटे प्रा. डॉ. भाग्यश्री पाटील डॉ. आनंद पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.शरद भामरे तर विशेष अतिथी म्हणून अभिनेते पत्रकार भूषण दुसाने यांची खास उपस्थिती होती. सदर शिबिर वडजाई धुळे येथे सुरू आहे! यावेळी प्रा. डॉ. पंडित घनश्यामजी यांनी सायबर गुन्हा व सायबर कायदे यांची विस्तृत माहिती दिली.शाहीन धाडा, असीम त्रिवेदी, बंगालचे प्रा. असमानंद महापात्रा यांच्या न्यायालयीन कार्यवाही विषयी तसेच विविध खटल्यांचा मागोवा घेतला. “अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विवेकाचे अभिव्यक्ती याचा यथोचित मूळतत्वाचे विवेचन डॉ. घनश्यामजी यांनी मांडताना विनोबा भावेंच्या स्थितप्रज्ञ, सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या “सजग ध्यानाचं” संदर्भ देत सायबर गुन्हे भविष्यात घडू नये यासाठी अत्यंत जागृत जागरूकपणे इंटरनेट मोबाईल, नेट सर्फिगं,फिशिंग स्टॉकिंग, सलामी अटॅक, याविषयी विशेष माहिती दिली. “अश्लील मेसेज” फॉरवर्ड करणे कायद्याने गुन्हा असून नव्या माहिती तंत्रज्ञान कायदा 2021अनुनुसार पाच वर्ष तुरुंगवास व त्या स्वरूपाचा आर्थिक दंड याचे नामनिधानाची तरतूद करण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, देशाची अखंडता, राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, कायम राहावा यासाठी “चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नये, करायला भाग पाडू नये अशा प्रकारचे विनम्र आवहान सुद्धा प्रा. डॉ. पंडित घनश्यामजी थोरात यांनी केले. व्याख्यानाच्या समारोपा नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अभ्यासपूर्वक उत्तरे डॉ. घनश्यामजी यांनी दिली.









